shaili magazine
जॉइन शैली

24

मराठी माणसाचा आवाज! राज ठाकरे यांचा कल्याण घटनेवर गंभीर आरोप

राज ठाकरे यांनी कल्याणमधील अत्याचारांवरून सरकार आणि राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या.

लोकेश उमक
Initially published on:
राज ठाकरे यांनी कल्याणमधील अत्याचारांवरून सरकार आणि राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या.
राज ठाकरे यांनी कल्याणमधील अत्याचारांवरून सरकार आणि राजकीय पक्षांवर जोरदार टीका

कल्याणमधील घटना केवळ एक घटना नाही, ती मराठी माणसाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभारणारी घटना आहे. राज ठाकरे यांनी या घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या राजकारणातील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात मराठी माणसाची सुरक्षा धोक्यात? राज ठाकरे यांचा सवाल. हे वाचा त्यांनी काय लिहिले त्यांच्या सोसिअल मीडियावर

सस्नेह जय महाराष्ट्र,

कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला , गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच.

पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही ! कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला ! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे. आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत.

मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो ! अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच ! ‘लाडकी बहीण’च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का ? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार ! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात ? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ…. हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना, प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं , तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदूत्व आम्ही देखील पुजतो परंतू हिंदूना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे !

मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी. राज ठाकरे ।

समाजhindi vs marathiindian politicskalyan incidentMaharashtra politicsMarathimarathi culturemarathi languagemarathi prideRaj Thackeray
लोकेश उमक
हा एक उत्सुक वाचक आहे आणि त्याला मनोरंजन, आरोग्य, जीवनशैली, संस्कृती, तत्वज्ञान आणि इतर अनेक विषयांमध्ये रस आहे. त्याचे क्युरेट केलेले लेख वाचायला विसरू नका.

Leave a Comment

वाचकांना हे पण आवडले

पंढरपूर ते अक्कलकोट किती किलोमीटर आहे, प्रवासासाठी कोणते मार्ग सोयीचे आहेत, बस-कार-रेल्वेने जाण्यास किती वेळ लागतो याची संपूर्ण माहिती मराठीत वाचा.
समजून घ्या

पंढरपूर ते अक्कलकोट किती किलोमीटर आहे? अंतर, प्रवासाचा वेळ आणि मार्गांची सविस्तर माहिती

पंढरपूर ते अक्कलकोट किती किलोमीटर आहे, प्रवासासाठी कोणते मार्ग सोयीचे आहेत, बस-कार-रेल्वेने जाण्यास किती वेळ लागतो याची संपूर्ण माहिती मराठीत वाचा.
स्तृती मराठे ला बघून शिंदे ह्यांनी केला इन्स्टा वर रिप्लाय, मानले रातराणीचा मधुगंध... वाचा तिची पोस्ट.
समजून घ्या

शिंदे म्हणाले: “रातरणीचा मनधुंद सुगंध तू” श्रुती मराठे हिने घातली साडी, वाचा तिने काय लिहिलं

स्तृती मराठे ला बघून शिंदे ह्यांनी केला इन्स्टा वर रिप्लाय, मानले रातराणीचा मधुगंध... वाचा तिची पोस्ट.
रोहताश खिलेरी कोण आहे व त्याने अचानक माऊंट एलब्रस का चढला? जाणूनघ्या त्याच्या मागचे कारण.
समजून घ्या

रोहताश खिलेरी [Rohtash Khileri]: शून्याखालील तापमानात विना ऑक्सिजन ‘माउंट एल्ब्रस’ Mount Elbrus का चढला?

रोहताश खिलेरी कोण आहे व त्याने अचानक माऊंट एलब्रस का चढला? जाणूनघ्या त्याच्या मागचे कारण.
कर्नाटक राज्यात आता धावणार bike Taxi, चला जाणूनघेऊ सविस्तरपने high court काय सांगतात.
समजून घ्या

Bike Taxi: कर्नाटक उच्च न्यायालयाचा HC मोठा निर्णय: राज्यात ‘बाईक टॅक्सी’ धावणार का?

कर्नाटक राज्यात आता धावणार bike Taxi, चला जाणूनघेऊ सविस्तरपने high court काय सांगतात.